बाया २
अनि तशी बुटकी पण
दिसायला आणि बोलायला म्हणजे एकच नंबर . शिकली पण बीकॉम , कॉम्पुटर चे बेसिक कोर्स पण
केलेले . घरची गरीब परिस्थिती . पण कधीही चेहऱ्यावर दिसून यायचे नाही इतकी खुश असायची
. वडील वारले पण एकानेही चांगले स्थळ आणले नाही.
सर्व बिजवर स्थळे आणीत . तिच्यात एखाद्या मुलाला पटवायची हिम्मत नव्हती असे
नाही पण ज्यांनी ज्यांनी तिच्यावर प्रेमाची नाटके केली ती फक्त तात्पुरती . फक्त वापर
करून घेण्यासाठी .
पण एखादे चांगले स्थळ
आले किंवा कोणी आणले तर बाकी भावकीतले आमच्यात हे बसत नाहीत ते बसत नाहीत म्हणून नाकारायचे
. कसेतरी एक मुलगा १२वी झालेलामुलगा आला पास
कि नापास तेही माहित नव्हते , तेंव्हा शेअर बाजार मध्ये मुंबईला सर्विसला आहे एवढीच
माहिती . मुंबईत राहायचे म्हणजे किती पगार ? कोठे राहतो याची काहीच चौकशी केली नाही
, आईने कर्ज काढून पोरीचे लग्न लावून दिले तसेही आईलाही फक्त लग्न उरकायचेच होते .
शेअर बाजारात घोटाळा
झाला आणि त्याची हजार बाराशेची नोकरीही गेली . बहिणीकडे राहायचा .
नणंदेने पूर्ण
उपयोग करून सर्विस गेल्यावर हिला गावाकडे हाकलले . मग तोपण गावाकडे आला . काहीच काम
करायची सवय नाही . हिने कुठल्याशा पतसंस्थेत क्लार्क म्हणून काम मिळवले . हा बेकारच
. बेकारीत ह्याला काही उद्योग तर हवा ना ? मग दारू पिवू लागला . आता रोज दारू पिवून
येतो आणि पोराला मारायला उठतो , कारण काय तर हे पोरग माझे नाही . संशय घेवून तिला मारतो
, पोरालाही मारतो . रात्रभर पोराला खुशीत घेवून झोपते नाहीतर पोराला हा ठारच मारेल
अशी भीती तिला वाटत असते. तिने धाडस करून घटस्फोटाचा निंर्णय घेत होती पण एकाही नातेवाईकाने
तिला साथ दिली नाही . अगदी आईने सुद्धा . तू त्याला सोडतेस म्हणजे खरेच तुझे काहीतरी
लफडे असेल असेच सर्व तिला म्हणतात . नवऱ्याच्या भयाने होती ती नोकरी सोडून दिली .
आता काहीच शिल्लक नाही , ना आत्मविश्वास , ना नोकरी. आता दुसऱ्या नणंदेकडे घरगडी म्हणून राहते . ती नणंद
पण हिच्यावर संशय घेते . आता लोक तिने नणंदेच्या नवऱ्याला कह्यात घेतले असे म्हणतात
.
बाईला कोठेही जागा नाही हेच खरे .
बाया ३
लक्ष्मी नवऱ्याने मारले म्हणून गावाला गेली खरी पण दोनच दिवसाने तिचा बाप तिला घेवून परत आला , दोन चार दिवस राहिला , लेकीच्या नान्न्यासाठी राहिला चार दिवस आणि जावयाला समजवुन परत गेला . पाचव्या दिवशी जावई लक्ष्मीचा पगार, स्वतःचा पगार घेवून मटका खेळायला गेला , अर्ध्या तासाने रिकाम्या हाताने परत आला . लक्ष्मीने जाब विचारला , आता महिनाभर काय खायचे , पोराच्या शाळेची फी कशी भरायची ? पण तिच्या नवऱ्याकडे त्याचे उत्तर नव्हते . सर्व कपडे भरून अजून तिला मारून तो चालला गेला .
आता लक्ष्मी रडत नाही , आई बापाला पण फोन करणार नाही म्हणाली , कोण नसतंय कुणाचे म्हणाली . माझं इथल्या पगारात भागतय म्हणाली . परत आलं तर मालकाला सांगून तेला हाकलून लावीन म्हणाली . कधी नव्हे ते मी सुखावले हे ऐकून ….