Tuesday, April 28, 2015

आठवणींचा हिंदोळा



होतास जेव्हा मिठीत
वचने हजार दिलीस
सुटली जेव्हा मिठी
मोडून सर्व गेलास

कशास खोटया शपथा
गोड शब्दांच्या ह्या बाता
कळते जरी मनाला
तरीही सुटतोच ताबा

असाच हा भुलय्या
भूलावितो मनाला
झुलवितो तनाला

शेवटी फक्त आठवणींचा हिंदोळा

No comments:

Post a Comment