तीन दिवसाचा विकेंड होता पण वरच्यांना आमच्या सुखाचा हा बहर कधी बघवतच नाही आणि शनिवारी प्रोजेक्ट रिलीज करावे
लागले … करणार काय झकत काम केले सुट्टी दिवशी . एवढी धावपळ करून होळी नळी साजरी करायची
म्हणून आणि लेक आईकडे सुट्टीला गेलीय म्हणून रविवारी आईकडे . रविवारी यायचे ठरवले पण
लेकीची डिमांड -- २४ तास तरी काढ माझ्याजवळ ….लेकीच्या ह्या आग्रहाच्या बहरावर मान
तुकवून … पुन्हा रात्रीच्या आणि सुट्टीच्या
झोपेच्या बहराला कात्री लावून चार वाजता उठून , आवरून भावाला उठवून थंडीत साडे पाचला पेठनाका गाठला .
एक जीपवाला आला , सर्व पुरुष त्यात चढले , भावाला चौकशी कर म्हणाले . तो गाडीवाला म्हणतोय
, सर्व जेन्ट्स आहेत हो , मग एकच लेडीज नको . असुदे बाबा म्हणाले . मग गाडी आली --मिरज
नाशिक . शिवाजीनगर पर्यंत जाणार म्हणून आणि साताऱ्यात जाणार नाही माझ्या आनंदाला खूपच
बहर आला , आता ऑफिस ला वेळेत पोहचणार आणि अप्रेझल
ची मिटिंग गाठता येणार म्हणून कोण कौतुक . पण नंतर कंडेक्टर ने गाडीला सुपर फास्ट ते
जनता गाडी बनवली . सातारा सोडून प्रत्येक हायवे वरच्या गावात बस थांबली . १५ मिनिटे
फ्रेश होण्यासाठी थांबली …
असुदे म्हणाले -- ड्रायवर फास्ट चालवतोय --- पुण्यात ९ वाजता
एन्ट्री ,स्वारगेट ला पोहचायला १० … हाय रे ट्राफिक चा बहर , शिवाजीनगरला पोहचायला
साडे दहा … घरी पोहचायला ११ आणि कंपनीत उशीर नेहमीसारखाच …
पण गर्दीच्या ,ट्राफिक च्या बहरपेक्षा पूर्ण गाडीतून रस्त्यावर
विविध फुलांचे जे बहर पहिले त्यावर उद्या …
No comments:
Post a Comment