लेखक : प्रकाश संत .
अमलताश (सुप्रिया
दीक्षित ) वाचून झाल्यानंतर ओढ लागली ते म्हणजे "वनवास " वाचण्याची . कारण
अमलताश मध्येच "लंप्या" ची तोंडओळख झाली होती . मग त्याचे भावविश्व जाणण्याचा
ध्यास लागला आणि वनवास वाचू लागले .
वनवास हा खरे तर कथासंग्रह,पण कथांमध्ये विभागले नसते तर कांदबरी हि होवू शकली
असती असे वाटते . तसं पाहायला गेले तर हे पुस्तक म्हणजे लहान मुलांसाठी लिहिले आहे
असे वाटते पण तसे नाही . हे पुस्तक कोणीही
कोणत्याही वयात वाचू शकते . लहानपणी ते वेगळ्याच दृष्टीने वाचू शकले असते म्हणून ते
अगोदर का मिळाले नाही असे वाटून राहिले . पण आताही वाचून मी माझे बालपण आठवून झाले
,पुन्हा त्यात रमावेसे वाटले आणि खरच मी मनापासून एन्जोय केले . ह्यात पोंगडावस्था
चालू असताना मुलांच्या मनात काय भाव असतात ,ते किती निरागस असतात , छोटी मुलं किती
निरागसतेने भरलेली असतात . त्यांच्या मनातले भाव अगदी सुंदर टिपले आहेत ह्यात . आई-बाबां
पासून दूर म्हणजे आजोळी राहिल्यावर ,आई बाबांची आठवण येवून वाटणारी रुखरुख , छोट्या भावंडाची
येणारी आठवण , आजी आजोबांचा फिरणारा मायेचा हाथ . उच्च शिक्षित आणि समंजस आजोबांची
नातवाला शिकवण्याची धडपड एकदम मस्त .
ह्यातील कन्नड भाषेचा
प्रभाव आणि त्यातून झालेली विनोद निर्मिती तर अगदी अफलातून आहे . मला अशी काही नावे
इथे देण्याचा मोह होतोच आहे .
"जंब्या कट्टमोळ , कनबार्ग्या गंग्या , वंटमुरीकर देसायांचा
बोका , टुकन्या , परग्या , हत्तनगडी आणि खूप सारी नावे ."
तसेच ह्यातील असणारी आकड्यांची मजा - उदाहरणार्थ -"दहा
गुणिले दहा भागिले शंभर , एक्काहत्तर गोष्टी . एकतीस जाडजूड खिळे ,वट्टात तेरा , एकशे
सत्तावीस प्रश्न , तेविशेलक्ष , एकोणीसशे साठ "--असे हे बेस्टच आकडे वापरले आहेत
त्यातून होणारा विनोद अगदी अफलातून .
मुलांना निसर्गाबद्दल
असणारे प्रेम , खेळण्याची असणारी अनावर ओढ , विनाकारण असणारी भीती --ह्याचे वर्णन अगदी
मस्त .
मुलांना मुलींच्या बद्दल
असणारे त्यावयातील वासनारहित आकर्षण . त्यासाठी वापरलेले "सुमीचे" पात्र एकदम मनाला
भिडते .
सर्वात छान म्हणजे "आजी आजोबा "--दुधाच्या साई सारखे
प्रेम काय असते ते अगदी जाणवते .
"वनवास" हे दिलेले नावहि अगदी सार्थक आहे . लहानपणी
ज्या गोष्टींचा कंटाळा असतो ,नकोशा वाटतात,वनवास वाटतो त्याच गोष्टी मोठेपणी वाचताना
तोच वनवास बरा होता आजच्या ह्या "धकाधकीचा,धावपळीच्या ,जगण्याचे हिशोब द्यावे
लागणाऱ्या " वनवासापेक्षा कितीतरी छान
आहे असे वाटते .
ह्यातल्या लंप्या च्या भाव विश्वातल्या कितीतरी गोष्टी आपण
अनुभवल्या आहेत आणि आपण त्याची आठवण काढतो हेच या पुस्तकाचे यश म्हणायला हवे .
शाळा ,आजोळ ,मित्र -मैत्रिणी , छोटी भावंडं अगदी जशीच्या तशी
उभी राहतात .
हे पुस्तक वाचले ,अंमळ
उशीराच वाचले तरीही का वाचले हे शेअर करावेसे वाटते म्हणून -
"ओझं ,चक्र ,भेट ,मैत्री " ह्या कथा खूप आवडल्या
.
"आदम ह्या कथेतील मजकूर खूप आवडला पण त्याचा आदम शी जोडलेला
संबध फारसा काही आवडला नाही
" विजय तरवडे" यांनी नंदिनी देसाई यांचा "अमलताश " ह्या पुस्तकाचा
रिव्ह्यू शेअर केला होता ,तो वाचून प्रकाश संताच्या ह्या लंप्या बद्दल मनात उस्तुकता
चाळवली आणि मग राज जैन यांच्याकडून मी "वनवास " हे पुस्तक मागवले आणि सुंदर
अनुभव गाठीशी जमा झाला . त्याबद्दल ह्या तिघांचेही आभार .
No comments:
Post a Comment