Wednesday, May 20, 2015

आजी आजोबा

शनिवार , निवांत कामे आटपून पुस्तक वाचत बसले होते . तोपर्यंत काही तरी गडबड गोंधळ बाहेर चालू असल्याचे ऐकले  म्हणून बाहेर डोकावले . तर दोन तीन माणसे समोरच्या आजोबाना धरून बाहेर आणत होती . आजोबा नीट स्लीपर ही घालू शकत नव्हते . कसेतरी एकाने स्लीपर त्यांच्या पायात चढवले . आजी मागून एक एक सूचना करत होत्या . आठ दिवस झाले चक्कर मारते आहे . ज्या दिवसापासून हा त्रास चालू झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी दवाखान्यात घेवून गेले होते . पण काही फरकच नाही . आता त्यांना अजिबात चालता येईना . बाथरुमला पण जाता येईना . रवीवारी पडले .
आजी आजोबांना जीना उतरायला चालू करोपर्यंत ह्या सूचना देत होत्या .

मी खाली येवू काय असे विचारत होत्या . समोरच्या माणसाने नको म्हणे पर्यंत ह्या सूचना चालू होत्या .माणसे जीना  उतरून खाली गेल्यावर आजी ग्यालरीत उभ्या राहून आजोबा कसे गाडीत चढतात त्या पाहत होत्या . मी तेव्हापासून त्यांच्याच बरोबर होते .

गाडी गेल्यावर मला त्यांनी पूर्ण पुन्हा सर्व सांगितले . म्हणाल्या दुपारी दोनपासून सर्वाना फोन लावतेय .तेव्हा आता सातपर्यंत हे लोक जमा झाले . मला तशी बटणे दाबता येत नाहीत , हात थरथरतात . आजोबाच फोन लावतात , पण त्यांना जमेना म्हणून एवढा वेळ . पाहुणे म्हणजे सुनेच्या बहीणीचा मुलगा आणि तिच्या आत्या बहिणीचा नवरा आहे असे सांगितले .
आजींची थरथर वाढली होती . घशाला कोरड पडत होती . मला काय करावे ते सुचेना . मग न राहवून आजींना विचारले . मुलांच्या जवळ का राहत नाही . आजी म्हणाल्या काय करणार -एक मुलगा तिकडे अमेरिकेत , जावून त्याला २० वर्षे झाली . वर्षातून एकदा येवून सर्व सोय करून जातो . दर रविवारी फोन करतो .
मग मी म्हणले , दुसरा मुलगा . आजी कचरतच म्हणाल्या . दुसऱ्याकडे जावून इथे पुण्यात राहिले असते पण तो कधीतरीच येतो नाहीतर गावाकडे असतो . बहुधा त्यांची सून आणि नातू राहत असावी इथे पण पुढे काही बोलल्या नाहीत .

पुढे मग म्हणाल्या , मला बिपी,डायबेटीस , अञ्जिओप्लास्टी  झालीय . मोठ्या मुलाचा चांगला फ्ल्याट आहे इथे तीन बी एच के चा . पण आम्हा दोघांना एवढा मोठा काय करायचा म्हणून तो भाड्याने दिला आणि इथे २ बी एच के भाडयाने घेतला . नेहमीच्या रिक्षा वाल्याला फोन करतो . मग तो नेतो आम्हाला दवाखान्यात . पैसे जातात पण फोन केल्यावर तो येतो. आज केला होता पण तो कोठे बाहेर गेला होता .

मुलगा जेनेटिक सायंटीस्ट आहे . त्याची बायकोही तिकडे सर्विस करते . नातू  आता पी एच डी करतोय , एक गावाकडे आजोबांनी जो जमीन जुमला घेतलाय तो धाकटा  मुलगा सांभाळतो .

एकूण काय तर सदया आजोबा अद्मित केले तर त्यांच्या जवळ कोणी नाही . आजी आजोबाना व्हिसाही मिळत नाही . कारण त्यांचे वय जास्त आहे. धाकटा मुलगा गावाकडे राहतो त्यामुळे दवाखान्याच्या सोयी नाहीत . दोघाही मुलांना मुलगी नाही . नाहीतर बिचारी इथे आजी आजोबांना सोबत राहिली असती .

आजी हताशपणे म्हणाल्या , सर्व असून काही उपयोग नाही . एखादी मुलगी असती तर चार दिवस माहेरला येवून राहिली असती . चटक्यात सोनू म्हणाली मी तुम्हाला फोनचे नंबर लावून देईन . चहा पाणी गरम करायचे असेल तर करून देयीन . आजी डोंट वरी . मी घरी असले कि तुम्ही बिनधास्त बेल मारा . मी तुम्हाला पेपर वाचून दाखविण . फोन लावून देयीन .चहा करून देयीन . डबा तर तुमचा येतोच .

आजींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले . थरथर बंद झाली . मग म्हणाल्या जा तुम्ही घरी , स्वयंपाक करा ग़रज लागेल तर बोलवेन .


पण अशा आजीआजोबांनी करायचे काय ?

No comments:

Post a Comment