शनिवार , निवांत कामे आटपून पुस्तक वाचत बसले होते . तोपर्यंत
काही तरी गडबड गोंधळ बाहेर चालू असल्याचे ऐकले
म्हणून बाहेर डोकावले . तर दोन तीन माणसे समोरच्या आजोबाना धरून बाहेर आणत होती
. आजोबा नीट स्लीपर ही घालू शकत नव्हते . कसेतरी एकाने स्लीपर त्यांच्या पायात चढवले
. आजी मागून एक एक सूचना करत होत्या . आठ दिवस झाले चक्कर मारते आहे . ज्या दिवसापासून
हा त्रास चालू झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी दवाखान्यात घेवून गेले होते . पण काही फरकच
नाही . आता त्यांना अजिबात चालता येईना . बाथरुमला पण जाता येईना . रवीवारी पडले .
आजी आजोबांना जीना उतरायला चालू करोपर्यंत ह्या सूचना देत होत्या
.
मी खाली येवू काय असे विचारत होत्या . समोरच्या माणसाने नको
म्हणे पर्यंत ह्या सूचना चालू होत्या .माणसे जीना
उतरून खाली गेल्यावर आजी ग्यालरीत उभ्या राहून आजोबा कसे गाडीत चढतात त्या पाहत
होत्या . मी तेव्हापासून त्यांच्याच बरोबर होते .
गाडी गेल्यावर मला त्यांनी पूर्ण पुन्हा सर्व सांगितले . म्हणाल्या
दुपारी दोनपासून सर्वाना फोन लावतेय .तेव्हा आता सातपर्यंत हे लोक जमा झाले . मला तशी
बटणे दाबता येत नाहीत , हात थरथरतात . आजोबाच फोन लावतात , पण त्यांना जमेना म्हणून
एवढा वेळ . पाहुणे म्हणजे सुनेच्या बहीणीचा मुलगा आणि तिच्या आत्या बहिणीचा नवरा आहे
असे सांगितले .
आजींची थरथर वाढली होती . घशाला कोरड पडत होती . मला काय करावे
ते सुचेना . मग न राहवून आजींना विचारले . मुलांच्या जवळ का राहत नाही . आजी म्हणाल्या
काय करणार -एक मुलगा तिकडे अमेरिकेत , जावून त्याला २० वर्षे झाली . वर्षातून एकदा
येवून सर्व सोय करून जातो . दर रविवारी फोन करतो .
मग मी म्हणले , दुसरा मुलगा . आजी कचरतच म्हणाल्या . दुसऱ्याकडे
जावून इथे पुण्यात राहिले असते पण तो कधीतरीच येतो नाहीतर गावाकडे असतो . बहुधा त्यांची
सून आणि नातू राहत असावी इथे पण पुढे काही बोलल्या नाहीत .
पुढे मग म्हणाल्या , मला बिपी,डायबेटीस , अञ्जिओप्लास्टी झालीय . मोठ्या मुलाचा चांगला फ्ल्याट आहे इथे तीन
बी एच के चा . पण आम्हा दोघांना एवढा मोठा काय करायचा म्हणून तो भाड्याने दिला आणि
इथे २ बी एच के भाडयाने घेतला . नेहमीच्या रिक्षा वाल्याला फोन करतो . मग तो नेतो आम्हाला
दवाखान्यात . पैसे जातात पण फोन केल्यावर तो येतो. आज केला होता पण तो कोठे बाहेर गेला
होता .
मुलगा जेनेटिक सायंटीस्ट आहे . त्याची बायकोही तिकडे सर्विस
करते . नातू आता पी एच डी करतोय , एक गावाकडे
आजोबांनी जो जमीन जुमला घेतलाय तो धाकटा मुलगा
सांभाळतो .
एकूण काय तर सदया आजोबा अद्मित केले तर त्यांच्या जवळ कोणी नाही
. आजी आजोबाना व्हिसाही मिळत नाही . कारण त्यांचे वय जास्त आहे. धाकटा मुलगा गावाकडे
राहतो त्यामुळे दवाखान्याच्या सोयी नाहीत . दोघाही मुलांना मुलगी नाही . नाहीतर बिचारी
इथे आजी आजोबांना सोबत राहिली असती .
आजी हताशपणे म्हणाल्या , सर्व असून काही उपयोग नाही . एखादी
मुलगी असती तर चार दिवस माहेरला येवून राहिली असती . चटक्यात सोनू म्हणाली मी तुम्हाला
फोनचे नंबर लावून देईन . चहा पाणी गरम करायचे असेल तर करून देयीन . आजी डोंट वरी .
मी घरी असले कि तुम्ही बिनधास्त बेल मारा . मी तुम्हाला पेपर वाचून दाखविण . फोन लावून
देयीन .चहा करून देयीन . डबा तर तुमचा येतोच .
आजींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले . थरथर बंद झाली . मग म्हणाल्या
जा तुम्ही घरी , स्वयंपाक करा ग़रज लागेल तर बोलवेन .
पण अशा आजीआजोबांनी करायचे काय ?
No comments:
Post a Comment