अमृता इमरोज : एक प्रेमकहाणी
लेखिका : उमा त्रिलोक
अनुवाद : अनुराधा पुनर्वसू
खरे पाहता मी अमृता प्रीतम यांचे एकही पुस्तक वाचलेले नाही किवा मला फार माहितीही नाही. फक्त ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे , अमृता प्रीतम एक भन्नाट ,निर्भीड आयुष्य जगल्या आणि इमरोज आणि त्यांचे प्रेम होते आणि अधून मधून फेसबुक वरील एखाद्या ग्रुपमधून चाललेल्या चर्चांमधून त्यांची माहिती मिळाली एवढेच .
पुस्तकजत्राच्या प्रदर्शनात हे पुस्तक मला दिसले आणि अंतरंगात पाहण्याची मला इच्छा झाली . वाचताना इमरोज चे अमृताजी वर किती प्रेम होते ते त्यातील त्यांच्या काही वाक्यामधून कळते . अमृताजी सुद्धा किती धाडसी असाव्यात ,एवढी इतक्या जुन्या काळी सुद्धा त्यांनी जे धाडस केले ते अफाट आहे . अमृताचे साहीर वर प्रेम असूनही ,भूतकाळ माहित असूनही ,कसलीही अपेक्षा न करता इमरोज त्यांच्या बरोबर राहिले म्हणजे त्यांचे किती निर्व्याज प्रेम होते ते दिसून येते .
नुसती कविता ऐकून घरात वेल लावणारे इमरोज ,चित्रकार इमरोज ,समंजस इमरोज अशी इमरोज ची बरीच वैशिष्टे समजतात पण त्यामानाने अमृताजींचे फार वैशिष्टे कळली नाहीत .
लेखिका त्यांना खूप उशिरा भेटल्यात म्हणूनच बहुतेक पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणे खूप सारे अपेक्षित होते ते आले नाही . कसे भेटले ? पहिल्यांदा काय मनात आले , दोघांच्याही मनाच्या तळात जायला लेखिकेला जमले नाही असे मला वाटते .
बाकी दोघांचे एकमेकांवर अगदी निस्सीम प्रेम होते हेच फक्त कळते .
काही पंजाबी कविता जशाच्या तशा दिल्यात आणि नंतर अनुवाद हे थोडं बरे वाटले .
लेखिका : उमा त्रिलोक
अनुवाद : अनुराधा पुनर्वसू
खरे पाहता मी अमृता प्रीतम यांचे एकही पुस्तक वाचलेले नाही किवा मला फार माहितीही नाही. फक्त ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे , अमृता प्रीतम एक भन्नाट ,निर्भीड आयुष्य जगल्या आणि इमरोज आणि त्यांचे प्रेम होते आणि अधून मधून फेसबुक वरील एखाद्या ग्रुपमधून चाललेल्या चर्चांमधून त्यांची माहिती मिळाली एवढेच .
पुस्तकजत्राच्या प्रदर्शनात हे पुस्तक मला दिसले आणि अंतरंगात पाहण्याची मला इच्छा झाली . वाचताना इमरोज चे अमृताजी वर किती प्रेम होते ते त्यातील त्यांच्या काही वाक्यामधून कळते . अमृताजी सुद्धा किती धाडसी असाव्यात ,एवढी इतक्या जुन्या काळी सुद्धा त्यांनी जे धाडस केले ते अफाट आहे . अमृताचे साहीर वर प्रेम असूनही ,भूतकाळ माहित असूनही ,कसलीही अपेक्षा न करता इमरोज त्यांच्या बरोबर राहिले म्हणजे त्यांचे किती निर्व्याज प्रेम होते ते दिसून येते .
नुसती कविता ऐकून घरात वेल लावणारे इमरोज ,चित्रकार इमरोज ,समंजस इमरोज अशी इमरोज ची बरीच वैशिष्टे समजतात पण त्यामानाने अमृताजींचे फार वैशिष्टे कळली नाहीत .
लेखिका त्यांना खूप उशिरा भेटल्यात म्हणूनच बहुतेक पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणे खूप सारे अपेक्षित होते ते आले नाही . कसे भेटले ? पहिल्यांदा काय मनात आले , दोघांच्याही मनाच्या तळात जायला लेखिकेला जमले नाही असे मला वाटते .
बाकी दोघांचे एकमेकांवर अगदी निस्सीम प्रेम होते हेच फक्त कळते .
काही पंजाबी कविता जशाच्या तशा दिल्यात आणि नंतर अनुवाद हे थोडं बरे वाटले .
पण आता अमृता प्रीतम यांचे सर्व साहित्य नक्कीच वाचायला हवे ,अशी इच्छा
निर्माण होते . एवढे काम हे पुस्तक नक्कीच करते . प्रेमकहाणी असूनही ह्या
पुस्तकातून अश्लील , कोणत्याही गटाने वाचू नये असे काहीही आले नाही ,हे
अतिशय चांगल्या पद्धतीने लेखिकेने साधले आहे .
No comments:
Post a Comment